Monday, January 11, 2016

दीपोत्सव किल्ले संवर्धक " शिवाजी ट्रेलचा"

दीपोत्सव किल्ले संवर्धक " शिवाजी ट्रेलचा"
आपल्या आठवड्यातील सुट्टीचा भेटणाऱ्या आरामाचा दिवस म्हटल कि तो म्हणजे रविवार. या वाराला अनेक घामाचे दवबिंदू चिटकविण्याचे काम गेली 20 वर्षे किल्ले संवर्धक "शिवाजी ट्रेल " करत आहे. या संवर्धन कार्यात अनेक चमत्कार घडलेले मला आपणास प्रकर्षाने सांगावेसे वाटतात. कारण ते आपल्याच शरीराशी निगडीत आहेत. किल्ले संवर्धन कार्य करत असताना गळणार्या घामाच्या धारांनी बर्याच मावळ्यांचे शुगर सारखे आजार बरे झालेत, ज्यांना डोळ्यांवर चश्मा लागला होता आता ते बिनधास्त चश्मा न वापरता किल्यांवर फिरतात, ज्यांना लिगामेंटचा त्रास होत होता ते आज पळू लागलेत तेही कुठलाही त्रास न होता. असे अनेक प्रकार आहेत. मग हा चमत्कार नाही का?
या पाठीमागचे कारण असे असु शकते कि गड किल्यावर असणार्या टाक्यांमध्ये आलेले औषधी पाणी. कारण अनेक औषधी वनस्पतींवर पावसाचे पाणी पडून ते जमीनीत जिरून या टाक्यांमध्ये साचले जाते. मी अनुभवले आहे कि या पिण्याच्या पाण्यापासून खोकला, सर्दी, ताप बरा होताना.
या पाठीमागचे दुसरे कारण येथे मिळणारा शुद्ध ऑक्सीजन, शुद्ध हवा, शरीराला थंडक देणारे वातावरण, संपूर्ण प्रदुषणांपासून दुर व शांतता प्रस्थापित करणारे हे ठिकाण. डोळ्यांना गारवा व सुख देणारी दृष्य याच ठिकाणापाशी आपणास मिळतात. म्हणूनच मित्रांनो या गड किल्यांच्या प्रेमात पडा व आपले जीवनमान वाढवण्याची जबाबदारी स्वतःच घ्या. आम्ही "शिवाजी ट्रेल " ने हेरले आहे, प्रत्यक्ष अनुभव घेतले आहेत म्हणुनच या संवर्धनाचे वेड लावुन घेतले आहे. त्यामुळे आमचा उपक्रम या विशाल सह्याद्रीच्या जटांवर आम्ही राबवत आहे. या जटांची निगा राखणे कर्तव्य समजुन गड किल्ले यांचेच फक्त संवर्धन करत नसून येथील परीसरातील अनेक गरीब व्यक्तींची वैद्यकीय सेवा, मुलांसाठी लायब्ररी, व अनेक उपक्रम कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता करत आहोत. आपणही यात सिंहाचा वाटा उचलात तर निश्चितच आपल्या हातून एक शुभकार्याचा उदय होईल.
या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला तो आमचे ट्रेल चे गुरू श्री . मिलिंदजी क्षीरसागर यांनी व त्यांच्या प्रयत्नशील वृत्तीस फळ लाभले व त्यांच्या अथक प्रयत्नाने आज महाराष्ट्रातील अनेक गड किल्ले सुखावत आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्यातील 81 किल्यावर दुर्गपुजा एकाच दिवशी आयोजित करण्यात आल्या होत्या. व या वर्षी प्रथमच सहा किल्यांवर दीपोत्सव साजरा करण्यात आला. यातील तीन किल्ले जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी, किल्ले चावंड व किल्ले नारायणगड यांचा समावेश होता. दीपोत्सव रोषणाईत उजळून निघालेले हे किल्ले रोषणाई मुळे त्यांचे अस्तित्व व वैभव त्यांना पुन्हा प्राप्त झाले होते कि काय असे वाटत होते. त्यांची सुंदरता अप्सरेला लाजवेल अशी दिसत होती. अशा या आनंदमय परीसरात बागडताना मानसिक आनंदाला खरोखरच सीमा नव्हती. मग देताय ना साथ या रानवेड्यांना? या आनंदात आपणही सहभागी व्हावे हीच सदिच्छा.
खास - आपला आवाज व आयवन न्युज या दोन्ही ही टिव्ही चायनल यांनी दिलेली साथ खरोखरच लाख मोलाची आहे त्यामुळे त्याचा येथे मी निसर्ग रम्य जुन्नर तालुका पेज परीवाराकडू धन्यवाद व्यक्त करतो.
श्री.खरमाळे रमेश
( माजी सैनिक खोडद )
निसर्ग रम्य जुन्नर तालुका




No comments:

Post a Comment